साक्षीभाव आणि तटस्थता असलेलं ‘रसाळ’ पुस्तक
सुधीर रसाळ यांच्या या पुस्तकाचं शीर्षक अन्वर्थक आहे. माणसाची गुणग्राहकता आणि ऋजुता किती सर्वसमावेशक आहे, हे त्यांच्या लेखनातून कळतं. नीरक्षीरविवेक त्यांच्या लेखणीत किती आहे हे त्याच्या सादरणीकरणातून, शैलीतून शब्दकळेतून कळून येतं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तींमध्ये काहीच उणेपण नाही असं नाही. पण त्यातून मनावर ठसतं, ते त्यांचं उबदार स्नेहशील, संस्कारी, विद्याप्रेमी, अन्यायाचा सामना करण्याचं धाडस.......